1. पूर्वजांचे अंतिम संस्कार योग्य प्रकारे न करणे: जर पूर्वजांचे अंतिम संस्कार योग्य रीतीने, विधीपूर्वक आणि शास्त्रानुसार केले नाहीत, तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. त्यामुळे पितृदोष लागतो.
2. श्राद्ध कर्म आणि पिंडदान न करणे: पितरांना मोक्ष मिळावा यासाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करणे आवश्यक असते. जर कोणी हे विधी केले नाहीत किंवा ते विसरले, तर पितृदोष लागण्याची शक्यता असते.
advertisement
3. पूर्वजांना दिलेले वचन पूर्ण न करणे: जर तुमच्या पूर्वजांना तुम्ही काही वचन दिले असेल आणि ते पूर्ण केले नसेल, तर यामुळे सुद्धा पितृदोष निर्माण होऊ शकतो.
4. वडीलधाऱ्यांचा अपमान करणे: घरात आपल्या वडीलधाऱ्यांचा, आई-वडिलांचा किंवा इतर ज्येष्ठांचा अनादर करणे किंवा त्यांना त्रास देणे हे देखील पितृदोष लागण्याचे एक कारण मानले जाते.
पितृपक्षाच्या सुरुवातीलाच नशिबाचं दार उघडणार! 5 राशीच्या लोकांसाठी पंधरवडा वरदान
5. विवाहबाह्य संबंध: जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने विवाहबाह्य संबंध ठेवले असतील, तर त्यामुळे पूर्वजांचा अपमान होतो आणि यामुळे पितृदोष लागतो.
6. पितरांच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणे: पूर्वजांनी कमावलेल्या संपत्तीचा किंवा मालमत्तेचा दुरुपयोग करणे किंवा ती चुकीच्या कामांसाठी वापरणे यामुळे सुद्धा पितृदोष लागतो.
7. वृक्ष तोडणे किंवा पर्यावरणाचा नाश करणे: काही धार्मिक ग्रंथांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने पिंपळ, वड किंवा इतर पवित्र मानलेल्या वृक्षांची अकारण तोडणी केली, तर यामुळेही पितृदोष निर्माण होऊ शकतो.
हातून नकळत घडलेल्या या गोष्टींमुळे पूर्वज अतृप्त राहतात; पितृदोष कुटुंबाला छळतो
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)