याशिवाय, ग्रामपंचायतीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गावातील जे ग्रामस्थ आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांना ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही किंवा त्यांना वारसा हक्कही दिला जाणार नाही. या निर्णयामुळे सामाजिक जबाबदारी आणि कौटुंबिक मूल्यांना प्राधान्य देण्याचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. प्रयाग चिखली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविराज पाटील यांनी ही माहिती दिली.
advertisement
Famous Misal Pune: 27 वर्षांचा वारसा, पुण्यात झणझणीत मिसळ खावी तर इथंच, असते मोठी गर्दी
निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार?
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने ठोस नियोजन केले आहे. उपसरपंच अर्जुन पाटील यांनी सांगितले की, शासनाकडून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांना मिळणाऱ्या मानधनातून या योजनेच्या खर्चाची तरतूद केली जाणार आहे. याशिवाय, गरज पडल्यास ग्रामपंचायत सदस्य स्वखर्चानेही हा उपक्रम राबविण्यास तयार आहेत. आम्ही आमचे मानधन गावाच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी वापरण्यास कटिबद्ध आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शंभर टक्के प्रवेशाचा निर्धार
प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे यासाठी शंभर टक्के प्रवेश निश्चित करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली शाळा प्रयाग चिखली येथेच सुरू केली होती. या ऐतिहासिक शाळेचे संवर्धन आणि गावातील शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. छ. शाहू महाराजांनी शिक्षणाचा पाया रचला, त्याच वारशाला पुढे नेण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत, असे उपसरपंच पाटील यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, त्यांच्या कार्यकाळात शंभर टक्के प्रवेशाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामपंचायत कसोशीने प्रयत्न करेल.
गावकऱ्यांचा उत्साह
या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा निर्णय गावातील मुलांचे भविष्य उज्ज्वल करेल, अशी भावना पालक व्यक्त करत आहेत. तसेच, वृद्धांचा सांभाळ करण्याचा निर्णय सामाजिक एकता आणि कौटुंबिक बांधिलकीला बळ देणारा आहे, असे गावकरी मानतात. प्रयाग चिखली ग्रामपंचायतीच्या या दोन्ही निर्णयांनी गावाला एक नवा आदर्श दिला आहे, ज्याची चर्चा आता जिल्हाभर होत आहे.