TRENDING:

ऐश्वर्या राय बच्चन झाली भावूक! पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद घेत म्हणाली, 'केवळ एकच जात आहे, ती म्हणजे...'

Last Updated:

Aishwarya Rai : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनने नुकतंच एका व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनने नुकतंच श्री सत्य साईं बाबांच्या जन्म शताब्दी सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी व्यासपीठावर येताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. बाबांच्या विचारांवर बोलताना ऐश्वर्या खूप श्रद्धा आणि भक्तीने ओथंबून गेली होती.
News18
News18
advertisement

पंतप्रधानांचे मानले आभार

ऐश्वर्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या कार्यक्रमात उपस्थित राहून सोहळ्याला खास महत्त्व दिल्याबद्दल आभार मानले. ऐश्वर्या म्हणाली, "श्री सत्य साईं बाबांच्या पवित्र जन्मशताब्दी सोहळ्यात माझे मन भक्ती आणि श्रद्धेने भरून गेले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभार व्यक्त करते की, त्यांनी या विशेष सोहळ्याला उपस्थित राहून सन्मान वाढवला. पंतप्रधान मोदींची उपस्थिती या सोहळ्यात पवित्रता आणि प्रेरणा जोडते. त्यांचे ज्ञानवर्धक, प्रभावशाली आणि प्रेरणादायक शब्द ऐकण्यास मी उत्सुक आहे," असे ती म्हणाली.

advertisement

ऐश्वर्याने पुढे नमूद केले की, मोदींची उपस्थिती आपल्याला सत्य साईं बाबांचा संदेश आठवण करून देते की, "सच्चे नेतृत्व सेवा आहे आणि मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे."

'केवळ एकच जात, ती म्हणजे मानवतेची'

ऐश्वर्या राय बच्चनने यावेळी श्री सत्य साईं बाबांच्या सार्वभौमिक विचारांवर भाष्य केले. ती म्हणाली, "बाबा नेहमी म्हणत असत की, 'केवळ एकच जात आहे, ती म्हणजे मानवतेची जात. केवळ एकच धर्म आहे, तो म्हणजे प्रेमाचा धर्म. केवळ एकच भाषा आहे, ती म्हणजे हृदयाची भाषा, आणि केवळ एकच ईश्वर आहे, आणि तो सर्वव्यापी आहे.'"

advertisement

ऐश्वर्याने बाबांच्या Five D's बद्दलही सांगितले, जे उद्देशपूर्ण आणि स्थिर जीवनासाठी आवश्यक आहेत, त्यात शिस्त (Discipline), समर्पण (Dedication), भक्ती (Devotion), दृढ संकल्प (Determination) आणि विवेक (Discrimination) यांचा समावेश आहे.

आई-वडिलांची पूर्वीपासूनची भक्ती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम 
सर्व पहा

ऐश्वर्या राय बच्चन आणि तिच्या कुटुंबाची सत्य साईं बाबांवर खूप जुनी आणि दृढ श्रद्धा आहे. केवळ ऐश्वर्याच नव्हे, तर तिचे आई-वडील आणि पूर्ण कुटुंब सत्य साईं बाबांचे भक्त आहेत. काही मिडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या जन्माच्या वेळी तिच्या पालकांनी पुट्टपर्थी येथे आशीर्वाद घेतला होता. इतकेच नाही, तर ऐश्वर्या सत्य साईं बाबांच्या 'बाल विकास' शाळेत धर्मशास्त्राची विद्यार्थिनी राहिली आहे. मिस वर्ल्डचा ताज जिंकल्यानंतरही तिने पुट्टपर्थी येथे आशीर्वाद घेतला होता.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
ऐश्वर्या राय बच्चन झाली भावूक! पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद घेत म्हणाली, 'केवळ एकच जात आहे, ती म्हणजे...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल