व्ही. शांताराम यांनी वयाच्या 20 व्या वर्षी 1921 मध्ये 12 वर्षांच्या विमलाबाईसोबत संसार थाटला. पण पुढे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान देखणे, रुबाबदार व्ही. शांताराम जयश्री कामलकर यांच्या प्रेमात पडले. शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि 1941 मध्ये त्यांनी लग्न केलं. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच त्यांनी दुसरा संसार थाटला होता. व्ही. शांताराम या विवाहित पुरुषासोबत लग्न केल्याने जयश्री यांना अनेकांनी हिणवलं. त्यामुळे त्या मानसिकरित्या खचल्या.
advertisement
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, वयाच्या 94व्या वर्षी अखेरचा श्वास
लग्नाच्या 15 वर्षांत जयश्री आणि व्ही. शांताराम यांच्यात खटके उडू लागले. दरम्यान त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री संध्याची एन्ट्री झाली. व्ही. शांताराम आणि संध्या यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे व्ही. शांताराम आणि संध्या यांच्या जवळीकचं संध्या यांना कळलं आणि त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटाच्या एका महिन्यातच व्ही. शांताराम यांनी संध्या देशमुख यांच्यासोबत तिसरं लग्न केलं.
'नवरंग' चित्रपटातील 'अरे जा रे हट नटखट' गाण्यातील स्त्री पुरुष अशी दुहेरी व्यक्तिरेखा साकारून संध्या यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. 'पिंजरा' हा त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरला. संध्या यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. यातूनच त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. संध्या यांनी मराठीसह हिंदी चित्रपटातही अभिनयाचा ठसा उमटवला. विमल, जयश्री या दोन पत्नी असतानाही व्ही. शांताराम यांनी संध्या यांच्यासोबत तिसरे लग्न केले. विशेष म्हणजे शांताराम यांच्या मुलांना त्यांनी आपलेसे केले. हीच आपली मुलं असे समजून त्यांनी स्वतःचे मूल होऊ दिले नाही.
