महाराष्ट्र शाहीरमध्ये तब्बल 11 गाणी
काही दिवसांपूर्वी आलेल्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमात तब्बल 11 गाणी रामानंद उगले यांनी गायली आहेत. तर पांडू या सिनेमातील एक गीत त्यांनी गायले आहे. त्याच बरोबर टाच मारुनी घोड्याला, गाडी घुंगराची अशी गाजलेली लोकगीते आणि असंख्य पोवाडे गायले आहेत. झी युवा वाहिनीवरील महाराष्ट्र सम्राट या कार्यक्रमात सहभाग घेऊन रामानंद उगले यांनी उपविजेतेपद मिळविले. तेव्हा पासून महाराष्ट्रातील घराघरात ते पोहचले. सध्या त्यांच्या युट्युब चॅनलवर अनेक लोकगीतांची निर्मिती करतात. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
दिव्यांग असूनही मानली नाही हार, आदित्यनं जे करून दाखवलं ते पाहून कराल सॅल्युट, Video
सात पिढ्यांपासून लोककलेचा वारसा
मागील सात पिढ्यांपासून आमचे कुटुंब या क्षेत्रात आहे. त्यामुळे लोककलेचं बाळकडू घरातूनच मिळालं. आमच्या वडिलांना आम्ही या क्षेत्रात येऊ नये असं वाटायचं. शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी असा त्यांचा आग्रह होता. मात्र आम्ही सगळेच या गोष्टी मध्ये तरबेज असल्याने आणि लोककला अंगात भिणल्याने आम्ही या क्षेत्रात येण्यापासून स्वतः ला रोखू शकले नाही, असं रामानंद उगले सांगतात.
बंधू कल्याण करतात गीतलेखन
रामानंद यांचे मोठे बंधू कल्याण उगले हे गीतलेखन काम करतात. तसेच काही वर्षांपासून शहरातील एका महाविद्यालयात लोककलेचा प्रशिक्षण देखील ते देत आहेत. सध्या त्यांच्याकडे 30 विद्यार्थी शिकत असून अतिशय नाममात्र शुल्क यासाठी आकारले जाते.