तळलेले पदार्थ टाळाच
पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यात तुमच्या घरात तळलेले पदार्थ बनविले जात असतील तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तेलकट पदार्थ देखील फार कमी प्रमाणात खाणं गरजेचं आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात भजी, बटाटावडा, बटाटा भजी किंवा विविध तळलेली पदार्थ बनविली जातातच. अशावेळी पोट भरून तळलेले पदार्थात खाल्ले जातात. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा थोडसं खाल्लं तर हरकत नाही. मात्र जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ खाल तर वजन नियंत्रणात ठेवू शकत नाही, असं दाते सांगतात.
advertisement
गोड पदार्थही खाण्यावर मर्यादा ठेवा
वजन कमी करण्यासाठी तेलकट तसेच गोड पदार्थ खाण्यावर देखील मर्यादा असणं गरजेचं आहे. सण उत्सवाचे दिवस असतात आणि यामध्ये अनेक गोड पदार्थ बनवली जातात. मात्र, हे गोड पदार्थ खाण्यावर मर्यादा असणे गरजेचे आहे. तसेच अनेकांना जास्त प्रमाणात चहा पिण्याची ही सवय असते. हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. कुठलेही गोड पदार्थ प्रमाणात खाल्ले तर वजनही नियंत्रणात राहतं, असा सल्ला गोड खाणाऱ्यांना आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना आहार तज्ञ देतात.
महिलांच्या 3 गंभीर समस्यांवर रामबाण उपाय आहे मेथी, त्वचेसोबत संपूर्ण आरोग्य सुधारेल!
भरपूर पाणी प्या
वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे ही गरजेच आहे. कधी कधी जेवण कमी पाणी जास्त पिण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. सोबतच पावसाळ्याचे दिवस असल्याने दूषित पाणी सेवन टाळण्यासाठी पाणीही उकळून पिणं गरजेचं आहे, असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. पावसाळ्यात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा.