सध्या या मार्गावर लोकल गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांना गाडीसाठी बराच वेळ थांबावे लागते. गर्दीच्या वेळी लोकल एका तासाच्या अंतराने आणि इतर वेळी दीड तासांच्या अंतराने धावत असल्याने अनेकदा प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. आता नव्या 20 लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांना गाडीची वाट बघत बसावं लागणार नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
Palawa Flyover: कोट्वधींचा खर्च अन् 6 वर्षे काम! रस्ते विकास महामंडळ टिकेचं धनी, काय आहे प्रकरण?
रेल्वे प्रशासनाने 10 अप आणि 10 डाउन अशा 20 लोकल गाड्या या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या 40 वरून 60 वर जाणार आहे. ही सुविधा नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा आणि प्रवाशांच्या मागणीचा विचार करून देण्यात आली आहे.
याशिवाय, उरण मार्गावर भविष्यातील प्रवासी संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याचा अंदाजही रेल्वेने व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे विमानतळालगत असलेल्या तारघर स्टेशनचा या मार्गाला थेट फायदा होणार आहे. हे स्टेशन सुरू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.
प्रवाशांच्या गरजेनुसार, रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने आणखी फेऱ्या वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. या निर्णयामुळे सीवूड्स-बेलापूर-उरणमार्गावरील प्रवास अधिक वेगवान, वेळेवर आणि सुकर होणार आहे, अशी अपेक्षा आहे.