TRENDING:

आता त्या पोटासाठी टाळी वाजवणार नाहीत! 80 तृतीयपंथींचा मोठा निर्णय, करणार हे काम!

Last Updated:

Inspiring Story: राज्यात पहिल्यांदाच 80 तृतीयपंथी भगिनींनी एकत्र येत स्वत:चा शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी माहिती दिलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर: तृतीयपंथीयांना समाजातील वंचित घटक म्हणूनच पाहिलं जातं. मिळकतीचे कायमचे साधन नसल्याने बऱ्याचदा पैसे मागूनच त्यांची रोजी-रोटी सुरू असते. परंतु, अहिल्यानगरमधील तृतीयपंथी भगिनींनी स्वावलंबनाच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलंय. 80 जणींनी एकत्र येत स्वावलंबी जगण्यासाठी शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केलीये. विशेष म्हणजे राज्यातील पहिल्या तृतीयपंथीयांच्या शेळीपालन केंद्रांचे उद्घाटन नुकतेच झाले. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

अहिल्यानगर येथील राहता तालुक्यातील चितळी या गावात तृतीयपंथियांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून शेळीपालन व्यवसायाची सुरुवात केली. तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेअंतर्गत राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे.

Success Story : घरात बसून काम नव्हतं, गृहिणीनं निवडलं आवडीचं क्षेत्र, आता दुसऱ्यांना देतात रोजगार!

advertisement

चितळी येथे 80 तृतीयपंथी भगिनींनी मिळून 5 वर्षांपूर्वी संस्थेच्या नावावर तीन एकर जागा घेतली होती. आज समाज कल्याण विभागाच्या पाच लाख रुपयांच्या शासकीय मदतीतून साधारण 2 हजार चौरस फूट क्षेत्रात पशुपालन शेड उभारण्यात आलं आहे. सध्या या केंद्रात 16 बकऱ्यांचे पालन केले जात आहे. तसेच शेजारीच एक हजार चौरस फूट क्षेत्रात निवासस्थानांचे बांधकाम देखील सुरू आहे. या जागेत निवासस्थान, कुपनलिका व तारेच्या कुंपणासाठी सामाजिक संस्थेने मदत केली आहे, असे दिशा पिंकी शेख यांनी सांगितले.

advertisement

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

शेळीपालन व्यवसायामुळे तृतीयपंथी भगिनींना आर्थिक मदती बरोबर आत्मसन्मानही मिळणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या व देशाच्या पातळीवर एक आदर्श ठरावा व तृतीयपंथीयांना या प्रकल्पाला बघून ऊर्जा मिळावी हा एकमेव उद्देश आहे. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार असल्याचंही शेख म्हणाल्या.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
आता त्या पोटासाठी टाळी वाजवणार नाहीत! 80 तृतीयपंथींचा मोठा निर्णय, करणार हे काम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल