याबाबत प्रतिमा कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं की, शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवरून ते परत येत होते. तेव्हा अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवली. त्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली.
advertisement
Mumbai : जेवणाच्या पार्सलचा वाद जीवावर, 22 वर्षीय तरुणाचा खून; दोघांना अटक
गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर, दोन्ही हातावर, पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. यामुळे डोक्याला ४ टाके पडले आहेत. तर डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला. यामुळे हेरंब कुलकर्णी थोडक्यात बचावले. अन्यथा त्यांच्या डोक्याला जबर मार बसला असता. या मारहाणीवेळी ते रस्त्यावर पडले. सध्या हेरंब कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर असून ते विश्रांती घेत असल्याचं पत्नी प्रतिमा यांनी सांगितलं.
हेरंब कुलकर्णी यांनी सिव्हील हॉस्पिटलला उपचार घेतले आणि तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तास झाले तरी पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नसल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी यांची पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी केला. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे असल्याच्या भावना त्यानी व्यक्त केल्या.
