हवामानातील अनिश्चिततेमुळे यापूर्वी 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत अमरावती-मुंबई विमानसेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. आता सेवा पुन्हा सुरू करत असताना कंपनीने वारंवार होणाऱ्या धुक्याचा आणि ढगाळ वातावरणाचा विचार करून उड्डाणांच्या वेळेत बदल केला आहे.
नववर्षाचा प्लॅन बदला! ‘इंडिगो’चा पुन्हा खोळंबा, पुण्यातून 'या' शहरांना जाणारी-येणारी विमाने रद्द!
advertisement
अमरावती-मुंबई विमानसेवा नवीन वेळापत्रक
नव्या वेळापत्रकानुसार अमरावती विमानतळावरून विमान दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी मुंबईकडे रवाना होईल आणि सायंकाळी 4 वाजता मुंबई विमानतळावर उतरेल. तर मुंबईहून दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी उड्डाण करून विमान दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी अमरावती विमानतळावर पोहोचेल.
अमरावती विमानतळाचे प्रबंधक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, हवामानात सातत्याने होणारा बदल आणि दाट धुके यामुळे दृश्यमानता कमी होत आहे. याच कारणामुळे विमानसेवेत मर्यादा आणाव्या लागत आहेत. प्रवाशांनी काही काळ संयम बाळगून अलायन्स एअर कंपनीला सहकार्य करावे.
दरम्यान, अमरावतीकर प्रवाशांना मुंबईसाठी असलेली थेट विमानसेवा आठवड्यातून फक्त दोन दिवस उपलब्ध राहणार असल्याने व्यावसायिक, शासकीय आणि वैयक्तिक प्रवास करणाऱ्यांना पर्यायी नियोजन करावे लागणार आहे. हवामान सुधारल्यास विमानसेवा पूर्ववत होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.






