मिळालेल्या माहितीनुसार, विराज घरातील कामात अपेक्षेप्रमाणे मदत करत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला समज देत रागावले होते. या कारणामुळे तो काहीसा नाराज झाला होता. घरातील या किरकोळ कारणाचा त्याने मनावर मोठा परिणाम करून घेतला आणि भावनेच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
advertisement
मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास विराज घरातून निघून गावाजवळील ‘काळशेत’ शिवारातील त्यांच्या शेताकडे गेला. तेथे सर्वे क्रमांक 119 मधील आंब्याच्या झाडाला त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. काही वेळानंतर त्याची बहीण शेतात गेली असता हा प्रकार तिच्या निदर्शनास आला. भावाला त्या अवस्थेत पाहून ती घाबरली आणि तिने तत्काळ कुटुंबीयांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व गावकरी घटनास्थळी धावले. त्यांनी तत्काळ विराजला खाली उतरवून उपचारासाठी कडा येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे भगत कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. खेळत्या-बागडत्या वयातील तरुणाने भावनेच्या भरात जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, लहान-मोठ्या कारणांमुळे युवकांनी टोकाचे निर्णय घेऊ नयेत, तसेच पालकांनीही आपल्या मुलांशी संवाद ठेवून त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.






