महायुतीतले दोन नेते आमने-सामने आले असून आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद टोकाला गेलाय. त्यातच समीर भुजबळ यांच्या भुमिकेने खळबळ उडाली आहे. समीर भुजबळ यांच्या भूमिकेबाबत विचारले असता छगन भुजबळ यांनी म्हटलं की, सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच असतो. समीर भुजबळ हे सुहास कांदे यांना उत्तर देतील. कांदे यांच्या आरोपाला कोर्टात उत्तर देऊ.
advertisement
आदित्यविरोधात शिंदे गटाचा मोठा डाव, 'या' तगड्या उमेदवाराला वरळीत उतरवणार
सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनवरून अनेक आरोप केले. यावर कांदे यांच्या आरोपाला मी कोर्टात उत्तर देईन असं म्हटलंय. आम्हाला कोणतीही नोटीस आली नाहीय. त्यांनीच सांगितलंय की पुन्हा अपिलात गेलं आहे. महायुतीत असताना अपिलात जाण्याची गरज काय असा सवाल भुजबळ यांनी विचारलाय.
नाशिकमध्ये दहशतीचं वातावऱण असल्याचं म्हटलं जातंय. यावर भुजबळ म्हणाले की, कुणीही सांगावे भीतीचं वातावरण कुणी केलं. त्यांच्यासारखे भीतीचे वातावरण करत नाही. आम्ही जमिनी लाटत नाही, खोट्या केसेस टाकत नाही, जेलमध्ये टाकत नाही. आम्ही फक्त विकासाचे काम मांडतो. कांदे यांनी निश्चित येवल्यात यावे स्वागत करतो. मागील वेळेपेक्षा 25 हजार अधिकचा लीड मिळेल.
समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नांदगावमधून गणेश धात्रक यांना तिकीट दिलं आहे, त्यामुळे नांदगावमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
