कुलकर्णी सांगतात की, “आपण असे म्हणतो की शहराला 52 दरवाजे होते. पण ऐकण्यामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये मोठी तफावत आहे. सर्व इतिहासाच्या नोंदी बघितल्या तर या दरवाजांची संख्या ही 30 च्या पुढे जात नाही. मुख्य शहर, बेगमपुरा, बाजीपुरा, नवखंड, किल्ले अर्क या पाच तटबंदीमध्ये असलेल्या सगळ्या दरवाजांची संख्या 30 आहे. तिच्या पुढे या दरवाजांची संख्या जात नाही. तसेच त्यांचे काही अवशेष देखील नाहीत. यातील सध्याला पाच दरवाजे नामशेष झालेले आहेत. यामध्ये हमखास दरवाजा, कुणी दरवाजा, खास गेट, मोती कारंजा दरवाजा आणि कुंभार दरवाजा हे पाच दरवाजे सध्याला अस्तित्वात नाहीत.”
advertisement
ZP Teachers News: ऐन निवडणुकीत जिल्हा परिषद शिक्षकांसाठी गुड न्यूज, 3 वर्षानंतर होणार मोठी घोषणा
असा समज झाला असावा
52 पुरांचे शहर म्हणून 52 दरवाजांचे शहर असा समज पसरवला गेला आहे. कदाचित त्यावरून 52 दरवाजांचे शहर असे नाव पडलेले आहे. पण या ठिकाणी विविध काळातील 54 पुरे आहेत. त्यामुळे 54 पुरांचे आणि 30 दरवाजांचे शहर आपण म्हणू शकतो. 30 पैकी 21 दरवाजे आपल्याला निश्चित पाहायला मिळतात. चार ते पाच दरवाजांचे अवशेष सध्याला शिल्लक आहेत,” असेही कुलकर्णी सांगतात.
दरम्यान, शहराला 52 दरवाजे होते अशा नोंदी इतिहासामध्ये किंवा कुठल्याही नकाशांमध्ये नाहीत. यामुळे शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणणे चुकीचेच आहे, असेही कुलकर्णींचे मत आहे.
सध्या अस्तित्वात असणारे दरवाजे
मकाई गेट, पैठण गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, भडकल गेट, रंगीन गेट, नवबत गेट, काला दरवाजा, बेगम दरवाजा, आदिल दरवाजा, हिजरी दरवाजा, कटकट गेट, कुंभार खिडकी, अरब खिडकी, जाफर गेट, भावसिंग पुराचे दोन दरवाजे, मेहमूद दरवाजा, बारापुल्ला दरवाजा, बायापुरा दरवाजा, नवाखंडा दरवाजा, फाजलपुराचा दरवाजा हे 21 दरवाजे सध्याला अस्तित्वात आहेत. त्यासोबतच बेगमपुरातील चावल गेट, निपर निरंजन गेट, विद्यापीठाकडून बेगमपुराकडे जाणारे दोन तटबंदी दरवाजे, बेगमपुरा पोलीस स्टेशन समोर दोन कमानी आहेत, त्यांचे अवशेष सध्याला शिल्लक आहेत.





