अनोळखी शहर, हातात पैसे नाहीत, शरीराने थकलेली आणि गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात असलेली ज्योती रांजणगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बसली होती. तेव्हा एका संवेदनशील महिलेची तिच्यावर नजर पडली. तिने ज्योतीची विचारपूस करून तिला जेवण दिले आणि तिची माहिती बालकल्याण समितीपर्यंत पोहोचवली. त्यानंतर ज्योतीला शहरातील ‘शक्ती सदन’ या संस्थेत सुरक्षित आश्रय मिळाला.
गंभीर आजार, पतीने साथ सोडली, पण तिच्यासाठी ‘देवदूत’ धावला, काय केलं?
advertisement
संस्थेत दाखल होताना ज्योतीला नववा महिना सुरू होता. काही दिवसांपूर्वीच तिने घाटी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. कठीण प्रसंगातही आईपणाची जबाबदारी सांभाळत ती नव्या आयुष्याची आशा मनात बाळगून आहे.
संस्थेच्या अधीक्षिका आम्रपाली बोर्डे यांनी सांगितले की, ज्योतीच्या दोन्ही मोठ्या मुलांना शिक्षणासाठी बालगृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवजात मुलीची काळजी ज्योती स्वतः घेईल. पुढील काही महिन्यांत ती पूर्णपणे सावरल्यानंतर तिला रोजगार मिळवून देण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
परक्या शहरात आलेल्या एका असहाय आईला छत्रपती संभाजीनगरने दिलेला आधार हा केवळ मदतीचा नव्हे, तर माणुसकीचा हात असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.






