दररोज साधारणपणे दीडशेहून अधिक लोकांना या उपक्रमातून जेवण दिले जाते. शहरातील जैन मंदिरात जेवण तयार केले जाते आणि दुपारी सुमारे एक वाजता वाहनाद्वारे घाटी रुग्णालय परिसरात आणून वितरण केले जाते. विशेष म्हणजे, जेवण वाटप सुरू झाल्यानंतर अवघ्या एका तासात संपूर्ण जेवण संपून जाते, इतकी याला मागणी असते.
या जेवणामध्ये पोळी, भाजी, भात आणि शिरा यांचा समावेश असतो. स्वच्छ आणि साधे, पण पौष्टिक अन्न देण्यावर भर ठेवण्यात येतो. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना अनेकदा जेवणाची अडचण भासते. अशा वेळी हा उपक्रम त्यांच्यासाठी उपयोगी ठरत असल्याचे दिसून येते.
advertisement
या सेवेसाठी जैन समाजाकडून तसेच इतर समाजातील नागरिकांकडूनही देणगी दिली जाते. इच्छुकांकडून एका दिवसाच्या जेवणासाठी सुमारे 4100 रुपये इतकी देणगी घेतली जाते. या योगदानातूनच हा उपक्रम अखंड सुरू ठेवला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम आजही नियमितपणे सुरू असून, शहरातील सामाजिक उपक्रमांमध्ये त्याचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.





