या योजनेचा लाभ सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे ग्रामीण व शहरी भागातील नागरिक घेऊ शकतात. या योजनेमुळे बँकेकडून कर्ज मिळणे सोपे होते आणि शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे व्यवसाय सुरू करताना लागणारा खर्च कमी होतो. त्यामुळे अनेक तरुण लहान-मोठे उद्योग, दुकाने किंवा सेवा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होत आहेत.
advertisement
Health Tips : अशक्तपणा अन् ताप, अजिबात करू नका दुर्लक्ष, असू शकतो गंभीर आजाराचा धोका
या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय साधारणपणे 18 ते 45 वर्षे असावे आणि किमान 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने याआधी शासनाच्या अशा प्रकारच्या अनुदानित योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्ज करताना आधार कार्ड, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, प्रकल्पाचा आराखडा (प्रोजेक्ट रिपोर्ट), बँक खात्याची माहिती आणि पासपोर्ट साईज फोटो अशी कागदपत्रे आवश्यक असतात.
या योजनेसाठी अर्ज जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने करता येतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेमार्फत कर्ज दिले जाते आणि उद्योग सुरू झाल्यानंतर शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी उपलब्ध होत असून राज्यात रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळत आहे.





