वन विभागाची गस्त
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने संवेदनशील ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले असून वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके हे स्वतः आपल्या पथकासह रात्री गस्त घालत आहेत. काही दिवसांपूर्वी अजिंठा-अंधारी धरण परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर नागझिरी भागातील अनाड शिवारात एका शेतकऱ्याच्या गोऱ्यावर बिबट्याने पहाटे हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे 45 ते 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सततच्या घटनांमुळे शेतकरी पिंजरे लावण्याची ठाम मागणी करत आहेत.
advertisement
जनजागृतीची गरज, संवर्धन वर्षात चिंता वाढली
बिबट्याच्या भीतीमुळे अनेक शेतकरी रात्री शेतात जाणे टाळत असून या परिस्थितीचा फायदा घेत बिबट्या गुरांवर हल्ले करत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने शेतकऱ्यांसाठी खबरदारीच्या उपायांबाबत जनजागृती मोहीम राबवावी, अन्यथा बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे युनोस्कोने 2026 हे वर्ष गाय, गुरे व दुभती जनावरांच्या संवर्धनासाठी घोषित केले असताना अशा घटनांमुळे संवर्धनाच्या उद्दिष्टांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची प्रतिक्रिया जैवविविधता अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी व्यक्त केली आहे.






