TRENDING:

गावातल्या विद्यार्थिनीची एक पोस्ट अन्‌ अख्खी यंत्रणा लागली कामाला, ST चे अधिकारी थेट घरी, काय घडलं?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीत शिकणाऱ्या मुलीनं सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्याची दखल थेट परिहवन मंत्र्यांनी घेतली. एसटीचे अधिकारी थेट घरी पोहोचले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात अजूनही शिक्षणाचा रस्ता सोपा नसतो. अंतर, संसाधनांची कमतरता आणि वाहतूक सुविधा नसल्यामुळे अनेक मुलांना आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागते. पण निंभोरा येथील अकरावीत शिकणारी जान्हवी महाजन मात्र या अडचणींनी खचून न जाता शिक्षणासाठी ठाम उभी राहिली, आणि तिच्या चिकाटीपुढे अखेर प्रशासनालाही निर्णय बदलावा लागला.
गावातल्या विद्यार्थिनीची एक पोस्ट अन् आख्खी यंत्रणा लागली कामाला, ST चे अधिकारी थेट घरी, काय घडलं?
गावातल्या विद्यार्थिनीची एक पोस्ट अन् आख्खी यंत्रणा लागली कामाला, ST चे अधिकारी थेट घरी, काय घडलं?
advertisement

निंभोरा गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील शेतात राहणाऱ्या जान्हवीसाठी रोजची ये-जा म्हणजे जणू एखादी परीक्षा. पाचोरा महाविद्यालयात जाण्यासाठी तिच्या शेताच्या बांधावरूनच एसटी बस जात असली, तरी अधिकृत थांबा गावातील बसस्थानकात असल्याने तिला रोज दीड किलोमीटर पायी चालत जावे लागे. सकाळच्या अंधारात किंवा सांजवेळी हा प्रवास करणे धोकादायकही ठरत होते.

वडिलांसह दुचाकीवरून जात होता चिमुकला, अचानक रक्तानं शर्ट माखला, छ. संभाजीनगरात काय घडलं?

advertisement

रोजचा त्रास पाहून काही वेळा कुटुंबीयांवर शिक्षण थांबवण्याची वेळ आली. पण शिक्षण न सोडण्याचा निश्चय करत जान्हवीने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवली. ग्रामीण मुलीला आलेल्या या अडचणीची दखल मंत्र्यांनी तात्काळ घेतली आणि जळगाव व छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिकाऱ्यांना त्वरित आदेश दिले.

advertisement

यानंतरची घटना पाटील कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरली. जळगाव विभाग नियंत्रक दिलीप बंजारा आणि पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील हे थेट तिच्या शेतात जाऊन बसथांबा मंजूर झाल्याची माहिती देताच कुटुंबीयांना क्षणभर विश्वासच बसला नाही. प्रशासनाने एवढ्या तत्परतेने प्रतिसाद देणे हीच त्यांच्या दृष्टीने मोठी आनंदवार्ता ठरली.

शेताच्या बांधावरच बसथांबा मिळाल्यामुळे आता जान्हवीचे शिक्षण अधिक सुकर झाले आहे. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणात वाहतूक हा सर्वात मोठा अडथळा मानला जातो. पण जान्हवीच्या धाडसाने आणि प्रशासनाच्या संवेदनशील भूमिकेमुळे हा अडसर दूर झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दगडूशेठ बाप्पाला 21 पालेभाज्यांची आरास, चतुर्थीचा डोळ्यांचं पारणं फेडणारा Video
सर्व पहा

ही छोटी पण महत्त्वाची घटना एका विद्यार्थिनीचे आयुष्य बदलून गेलीच, पण ग्रामीण शिक्षणव्यवस्थेतील अडचणी आणि त्यावर होऊ शकणाऱ्या उपायांचीही चर्चा पुन्हा एकदा पुढे आणणारी ठरली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
गावातल्या विद्यार्थिनीची एक पोस्ट अन्‌ अख्खी यंत्रणा लागली कामाला, ST चे अधिकारी थेट घरी, काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल