मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव येथील संजय व पिंकाबाई देवळे हे जोडपं मोहंद्री शिवारातील अच्युतराव जाधव यांच्या शेतात काम करत होते. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ते राहत होते. मंगळवारी रात्री पती संजय याने पत्नी पिंकाबाईजवळ मोबाइल बघितला आणि "तुला मोबाईल कुणी दिला", अशी विचारणा केली. पिंकाबाईने काही एक उत्तर न दिल्याने रागाच्या भरात पतीने मोबाइल चुलीत टाकून दिला. या कारणावरून पती-पत्नीत जोरदार भांडण झाले. यावेळी पती संजय याने काठीने पत्नी पिंकाबाईला मारहाण करून तिचा गळा दाबला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती घरातच झोपी गेला.
advertisement
लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून वैष्णवीसोबत काय काय घडलं? अंगावर शहारे आणणारा घटनाक्रम
दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी अच्युतराव जाधव यांना या वादाची माहिती देणारा फोन आल्याने ते शेतात गेले. तेव्हा त्यांना पिंकाबाई निपचीत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी आरोपी संजय देवळे व इतर काही लोकांच्या मदतीने पिंकाबाईला पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पंचनाम्यात पिंकाबाई हिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसून आले. त्यामुळे त्यांनी आरोपी पती संजय देवळे याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने काठीने मारहाण करून गळा दाबल्याने पिंकाबाईचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, अच्युतराव जाधव यांच्या फिर्यादीवरून संजय देवळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संजय देवळे याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.






