बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेत काही नाही तरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालीय हे नाकारता येणार नाही.आपल्या सगळ्यांची मदत झाल्याशिवाय ते खासदार होऊ शकले नाहीत.
विशाल पाटलांच्या विजयात वसंतदादा पाटलांची पुण्याईसुद्धा कामी आली. शिवसेनेचे इथे बसले आहेत. तुम्ही आम्हाला माफ करा. सगळ्यांच्याच मदतीनं विशाल पाटील खासदार झालेत हे नाकारता येणार नाही. ते खासदार झाले ही चांगली गोष्ट आहे असंही थोरात यांनी म्हटलं.
advertisement
विधानसभेची निवडणूक आली तेव्हा माझ्यासमोर प्रश्न होता. एकीकडे जयश्री पाटील आणि दुसरीकडे मदन पाटलांचे कुटुंबिय. ते कुटुंबसुद्धा जवळचं होतं. पृथ्वीराज बाबासुद्धा जवळचे होते. असा परिस्थितीत निर्णय घेणं कठीण होतं, पक्षालाच हा निर्णय कठीण होता असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
पृथ्वीराज पाटील यांनी दहा वर्षे सातत्यानं कष्ट केलं, धडपड केली. सर्वेक्षणाच्या आधारावर त्यांना उमेदवारी दिली. याचं स्वागत करून जयश्री पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता. आम्ही त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊ असं ठरलेलं. त्यांना बंड करायला नको होतं असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.