देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा महानायकाबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य अनुचित आहे. संभाजी भिडेच काय कोणीच कोणीच असे वक्तव्य करू नये. करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे निश्चितपणे संताप तयार होतो.
Sambhaji Bhide : भिडेंवर गुन्हा दाखल होताच अटकपूर्व जामिनासाठी हालचाली
advertisement
लोक महात्मा गांधीच्या विरुद्ध बोललेलं कधीही सहन करणार नाहीत. राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल. महात्मा गांधी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो कुणाबद्दल आम्ही खपवून घेणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांनाही इशारा दिला आहे.
संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतःची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याच काही कारण नाही. ज्या पद्धतीने या वक्तव्याचा काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल गल्लीछ शब्दात राहुल गांधी बोलतात. त्याचाही निषेध कॉंग्रेसवल्यानी त्यांनी केला पाहिजे. त्यावेळी मात्र ते मिंदे होतात. कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधीचा अपमान सहन केला जाणार नाही असेही फडणवीस म्हणालेत.
