TRENDING:

Devendra Fadnavis : मराठ्यांचं आंदोलन संपलं आता ओबीसींचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगून टाकलं

Last Updated:

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटताच आता ओबीसी समाजाने आंदोलनाचं हत्यारं उपसलं आहे. या आंदोलनावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच भूमिका मांडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Devendra Fadnavis on OBC Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य करत त्यासंबंधित जीआर सुपूर्द केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटताच आता ओबीसी समाजाने आंदोलनाचं हत्यारं उपसलं आहे. या आंदोलनावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच भूमिका मांडली आहे.
devendra fadnavis on obc reservation
devendra fadnavis on obc reservation
advertisement

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात जे मराठवाड्यात राहणारे आहे. जे आमच्या मराठा समाजाचे लोक आहेत.कधी काळी रक्त नात्यात कुणी असेल ज्यांचा कुणबी म्हणून उल्लेख असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल. हैदराबाद गॅझेटियरनमुळे आता हे शक्य होणार आहे.ज्यांच्याकडे आता पुरावा असेल त्यांना आरक्षण मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

advertisement

तसेच ओबीसी समाजामध्ये भीती होती, सरसकट आरक्षण घेतील आणि इतर समाजही घुसण्याचा प्रयत्न करणार असं वाटतं होतं. आता तसं होणार नाही.आता ज्यांचा दावा आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळेल आहे. हा प्रश्न सगळ्यात मराठवाड्यात महत्त्वाचा होता तिथे रेकॉर्डच नव्हते. पण आता संवैधानिक तोडगा आम्ही काढला आहे, आता तो कोर्टामध्येही टिकेल. मंत्रिमंडळ समितीच्या कामावर मी समाधानी आहे,असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करून सांगितलं.

advertisement

मला असं वाटतं साखळी उपोषणाची आवश्यकता नाही. ओबीसी समाजामध्ये गैरसमज होता, त्यांचं आरक्षण काढून इतर समाजाला देणार पण आता असं कुठेही होणार नाही. आता ओबीसी समाजाने आता आंदोलन परत घेतली पाहिजे. जोपर्यंत हे सरकार आहे दोन समाजामध्ये एकमेकांमध्ये आणणं त्यात तिढा आणणं, एकमेकांसमोर उभं करणे हे आम्ही कधीच करणार नाही. महाराष्ट्राचं सामाजिक विण आमच्यासाठी महत्त्वाची आहे,असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

advertisement

दोन समाजाला न्याय द्यायचा, त्यांच्यामध्ये तेढ निर्माण होणार नाही, दोन समाजामध्ये वाद होणार नाही, याचा विचार करून निर्णय घेतला. कायदेशीर निर्णय घेतला आहे. याचा निर्णय उपसमितीला दिला पाहिजे. त्यांनी खूप मेहनत घेतली. मला दोष दिला, शिव्या दिल्या. मी समाजासाठी कालही काम करत होतो, आजही करत होतो. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, किंवा इतर कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी माझं काम करणं मी कर्तृव्य समजतो. हे काम करताना तुम्हाला कधी शिव्या मिळतात तर कधी हारही मिळत असतात.

advertisement

मला असं वाटतं आता कोण काय करणार याबद्दल मी बोलू शकत नाही. मराठा समाजाला जे जे पाहिजे होतं ते ते दिलं आहे. याआधीही आरक्षण दिलं होतं. कोर्टामध्ये टिकलंही होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळीही काम केलं होतं. सारथी तयार केली. मराठा समाजाचा आयपीएसमध्ये टक्का वाढला आहे.नरेंद्र पाटील आर्थिक विकास मंडळ सक्षम केलं. दीड लाख मराठा लोकांना उद्योजक बनवलं आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : मराठ्यांचं आंदोलन संपलं आता ओबीसींचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगून टाकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल