ज्योतिबाची वाडी हे बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं खेडेगाव आहे. दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात डोंगर पायथ्याच्या कुशीत श्री ज्योतिबाचं देवस्थान आहे. निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या ज्योतिबाच्या वाडी गावाला एक वेगळाच इतिहास आहे. या गावात मांसाहार केला जात नाही. शेकडो वर्षांपासून हे गाव शुद्ध शाकाहारी असून गावात कोणत्याही प्राण्याची मांसाहारासाठी हत्या होत नाही, असे गावकरी सांगतात.
advertisement
दिवाळीत का फोडतात फटाके? धर्मशास्त्रात सांगितलंय महत्त्वाचं कारण
ज्योतिबाची वाडी येथील महिलांना मांसाहारी जेवणाची रेसिपीच माहिती नाही. कारण गावात कधीच मांसाहारी जेवण बनवले जात नाही. किंबहुना बाहेर गावच्या मुली लग्न होऊन गावात आल्यास त्याही गावाची परंपरा पाळतात, असंही गावकरी सांगतात.
श्री ज्योतिबाचं देवस्थान असलेल्या या गावात दरवर्षी ज्योतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रा उत्सवाला धाराशिवसह लातूर, बीड, सोलापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून मोठी गर्दी होत असते. मात्र, हे गाव अद्यापही विकासापासून वंचित आहे. गावात पुरेशा सोयीसुविधांचा अभाव असल्याची तक्रारही गावकरी करतात.