TRENDING:

पांढरं सोनं पाण्यात, अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला कापूस मातीमोल; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

Last Updated:

ऑक्टोबर महिन्यात मान्सून माघारी परतल्यानंतरही अवकाळी पाऊस पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांचं पांढरं सोनं काळवंडू लागलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

एकीकडे दिवाळी उलटून न मिळालेली सरकारी मदत अन् दुसरीकडे लहरी निसर्गाची दगाबाजी. शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही हा उद्विग्न सवाल आता स्वतः शेतकरीच विचारू लागले. जालन्यातील नंदापुर गावातून लोकल १८ ने पावसामुळे कापूस पिकाच्या निकसानीचा घेतलेला हा आढावा... जालना शहरापासून केवळ १२ किमी अंतरावर असलेल्या नंदापुर गावात रविवारी रात्री ८ वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. दोन तास मुसळधार पावसाचे अक्षरशः झोडपून काढले.

advertisement

प्रकाश उबाळे यांच्या शेतात वेचणीस आलेलला जवळपास पाच क्विंटल कापूस भिजला. दिवाळाच्या आधीपासूनच दररोज सकाळी एकदा आणि रात्रीएकदा असा दिवसांतून दोन वेळा पाऊस येतो. घरी दिवाळीला लेकी बाळी आल्या आहेत. म्हणून कपसाचीवेचणी लांबली. जवळपास पाच क्विंटल कापूस शेतात भिजला. आता त्यातील सरक्यांना कोंब फुटले आहेत. बाजारात ३ हजार रुपये क्विंटल पण हा कापूस विकेल की नाही याची खात्री नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

आम्ही करावं तर नक्की काय करावं. सरकार ने दिवाळी आधी मदत करू असं सांगितलं. पण दिवाळी होऊन गेली तरी एकही रुपया खात्यात जमा झाला नाही. लेकींना साडी न घेताच माहेरी पाठविण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी प्रकाश उबाळे यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पांढरं सोनं पाण्यात, अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला कापूस मातीमोल; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल