याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील बस स्टँड परिसरात असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. जालना शहरातून छत्रपती संभाजीनगर मार्गे पुणे आणि इतर शहरात जाणारी बस सेवा देखील विस्कळीत झाली आहे. शहरातील दोन्ही कुंडलिका आणि सीना नद्यांना पूर आल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. अन्नधान्याचं नुकसान झालं असून घरगुती सामान वाहून गेलं आहे.
advertisement
Mumbai Weather: मुंबईवर पावसाचं संकट, कोकणातही मुसळधार कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट
शहरातील लक्कलकोट भागामध्ये लाकडी वस्तू बनवण्याचं काम केलं जातं. नदीला पूर आल्याने लाकडासह लाकूड कापण्याच्या मशीन देखील वाहून गेल्या आहेत. पुलावर उभ्या असलेल्या दोन ते तीन चारचाकी गाड्या वाहून गेल्याचं बस स्टँड परिसरातील नागरिकांनी लोकल 18शी बोलताना सांगितलं. त्याचबरोबर नदीकाठच्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. अनेक नागरिकांनी रात्र जागून काढली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर तातडीची मदत करावी. मदत व बचाव कार्य सुरू करावं, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.