TRENDING:

अस्मानी संकट आलं अन् होत्याचं नव्हतं झालं, कांदा कुजला, महिला शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी!

Last Updated:

Onion Farming: अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जालन्यातील शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील अस्मानी संकटानं मोठं नुकसान झालं असून उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी संकटात आहे. जालना जिल्ह्यात कांदा शेतातच सडल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. याबाबत लोकल18 ने थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
advertisement

जालना जिल्ह्यातील वखारी येथील मनकरणा अंकुशराव घुले या अल्पभूधारक महिला शेतकरी आहेत. आपल्या अर्धा एकर क्षेत्रावर त्यांनी तीन महिन्यांपूर्वी कांदा पिकाची लागवड केली होती. शेतामध्ये कांद्याची काढणी करून झाली होती. पाऊस आल्याने शेतामध्येच हा कांदा झाकून ठेवण्यात आला होता. परंतु 5 मे पासून दररोज पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतातील कांदा हालवणं शक्य झालं नाही आणि काढलेला कांदा जाग्यावरच सडल्याचे चित्र आहे.

advertisement

एकीकडे धो धो पाऊस, पण छ. संभाजीनगरच्या 65 गावांवर जलसंकट, पिण्यासाठीही नाही पाणी!

काहीतरी नवीन पिक घ्यावं म्हणून कांदा पिकाची लागवड केली होती. अर्धा एकर मध्ये त्यांना 60 क्विंटलपर्यंत कांद्याचे उत्पन्न झालं. पीक चांगलं जोमात आलं, पण पावसाने सगळं हिरावून घेतलं. तबल 40 टक्के कांदा रानातच सडून गेल्याने त्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे घातलेला खर्च निघणंही मुश्किल झालंय, असं मनकरणा घुले सांगतात.

advertisement

घरची परिस्थिती बेताची

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

“मला पती नाहीत, नीट नेटकं घर नाही. मुलगा अपंग आहे. गरीबीचा संसार आहे. त्यात हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. शासनाने नुकसानीची दखल घेऊन मदत करावी,” अशी अपेक्षा मनकरणा घुले यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
अस्मानी संकट आलं अन् होत्याचं नव्हतं झालं, कांदा कुजला, महिला शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल