जालना जिल्ह्यातील वखारी येथील मनकरणा अंकुशराव घुले या अल्पभूधारक महिला शेतकरी आहेत. आपल्या अर्धा एकर क्षेत्रावर त्यांनी तीन महिन्यांपूर्वी कांदा पिकाची लागवड केली होती. शेतामध्ये कांद्याची काढणी करून झाली होती. पाऊस आल्याने शेतामध्येच हा कांदा झाकून ठेवण्यात आला होता. परंतु 5 मे पासून दररोज पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतातील कांदा हालवणं शक्य झालं नाही आणि काढलेला कांदा जाग्यावरच सडल्याचे चित्र आहे.
advertisement
एकीकडे धो धो पाऊस, पण छ. संभाजीनगरच्या 65 गावांवर जलसंकट, पिण्यासाठीही नाही पाणी!
काहीतरी नवीन पिक घ्यावं म्हणून कांदा पिकाची लागवड केली होती. अर्धा एकर मध्ये त्यांना 60 क्विंटलपर्यंत कांद्याचे उत्पन्न झालं. पीक चांगलं जोमात आलं, पण पावसाने सगळं हिरावून घेतलं. तबल 40 टक्के कांदा रानातच सडून गेल्याने त्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे घातलेला खर्च निघणंही मुश्किल झालंय, असं मनकरणा घुले सांगतात.
घरची परिस्थिती बेताची
“मला पती नाहीत, नीट नेटकं घर नाही. मुलगा अपंग आहे. गरीबीचा संसार आहे. त्यात हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. शासनाने नुकसानीची दखल घेऊन मदत करावी,” अशी अपेक्षा मनकरणा घुले यांनी व्यक्त केली.





