गरज शोधाची जननी
सुनील शिंदे हे घनसावंगी तालुक्यातील धामणगावचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे पारंपारिक 17 एकर शेती आहे. शेती सांभाळून ते वेगवेगळे प्रयोग करत असतात. गावात पंधरा दिवस वीज नसल्याने पिठाची समस्या निर्माण झाली. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या आईने घरी असलेल्या जात्यावर ज्वारी दळण्यास सुरुवात केली. जात्यावर दळलेल्या या ज्वारीच्या भाकरी अतिशय चवदार लागल्या. याबाबत त्यांनी आपल्या आईशी विचारणा केली असता नैसर्गिक पद्धतीने पीठ गरम न होता तयार होत असल्याने धान्यातील जीवनसत्वे निघून जात नाहीत. यामुळे भाकरी पौष्टिक लागल्याचं त्यांच्या आईने शिंदे यांना सांगितलं. इथूनच पेडलवर चालणाऱ्या गिरणीची निर्मिती सुरुवात झाली.
advertisement
शेतकऱ्याची सोयाबीनपासून दूध आणि पनीर निर्मिती; महिन्याला 40 हजार निव्वळ नफा, पाहा Video
देशभरातून गिरणीला मागणी
ही गिरणी तयार करण्यासाठी त्यांना असंख्य अडचणी आल्या. मात्र प्रत्येक अडचणीवर मात करून त्यांनी गिरणी अधिक अधिक सोयीची कशी होईल यासाठी प्रयत्न केले. जेव्हा गिरणी परफेक्ट तयार झाली असं त्यांना वाटलं तेव्हाच त्यांनी या गिरणीतून काम सुरू केलं. लोकांना देखील गिरणी आवडू लागली. सध्या त्यांना जालना शहराबरोबरच पुणे, मुंबई, नाशिक तसेच इतर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामुळेच त्यांनी जालना शहरात गिरणी निर्मितीचे स्वतंत्र युनिट सुरू केले आहे. ही गिरणी तयार करण्यासाठी वीस हजारांचा खर्च येत आहे. तयार झालेल्या गिरणीची 22 हजार रुपये एवढी किंमत त्यांनी ठेवली आहे. परराज्यातील ऑर्डरसाठी जीएसटी चार्जेस वेगळे असतील. या गिरणीच्या पेटंटसाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरू केले असून वर्षभरामध्ये पेटंट मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
महिला मंदिरात का फोडत नाहीत नारळ? जाणून घ्या खरं कारण Video
लवकरच पेटंट मिळेल
मी एक साधा शेतकरी आहे. घरी 17 एकर शेत जमीन आहे. गावात अनेक दिवस लाईट नसल्याने मला ही संकल्पना सुचली आणि मी त्यावर काम सुरू केलं. आजूबाजूच्या लोकांना गिरणी आवडल्याने मोठ्या स्तरावर गिरणी निर्मितीसाठी चालना शहरात काम सुरू आहे. राज्यातून तसेच बाहेर राज्यातून देखील या गेलेला मोठ्या प्रमाणावर ऑर्डर येत आहेत. गिरणीच्या पेटंट साठी देखील फाईल दाखल केली आहे. ते काम देखील लवकरच होईल असं सुनील शिंदे सांगतात.