जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं असून कपाशी आणि सोयाबीनची पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे या पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करून योग्य ती मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे.
Thane Rain: ठाण्यात पावसाचा कहर, रस्त्यावर पाणी, भांडुपमध्ये 5 घरांसह कोसळली दरड, PHOTOS
advertisement
हवामान विभागाने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. नांदेड लातूर परभणी आणि जालना जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून परतुर तालुक्यातील केसुला नदीला पूर आल्याचे पाहायला मिळते.
मंठा तालुक्यातील वडगाव सरहद गावामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला आहे आणि या पुराचे पाणी थेट गावामध्ये शिरल्याने गावाचे जनजीवन विस्कळीत झाले. वडगाव सरहद गावामध्ये नदीची पाणी शिरल्याने गावातील किराणा दुकानात आणि नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले. सरकारने झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ मुंजाजी रेंगे यांनी केली आहे.





