लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळवण्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागणार आहे. तरच संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे सर्व लाभार्थींना संबंधित रक्कम थेट बँकेत जमा होण्यासाठी आधार लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या शहरातील संजय गांधी कार्यालयात कागदपत्रांसह भेटावे लागेल, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
advertisement
Mhada Lottery 2024: हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्याची संधी, ‘म्हाडा’ अर्जासाठी मुदतवाढ
निराधार व्यक्तींना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याअखेर ठराविक मानधन दिले जाते. जालना शहर तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन योजना या लाभार्थ्यांना डी.बी.टी. मार्फत त्यांचे खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे. जालना शहरातील लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. जे लाभार्थी सदर कागदपत्र या कार्यालयास सादर करणार नाही. त्यांचा लाभ बंद झाल्यास त्यासाठी लाभार्थी स्वत: सर्वस्वी जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी, अशी माहिती तहसिलदार जालना छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.






