राजेश टोपे यांनी म्हटलं की, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. बोलण्याचं स्वातंत्र्य असल्याने त्यांनी ते विचार मांडले. पण पक्षाचा व या वक्तव्याचा काही संबंध नाही. सगळ्यात धारदार शस्त्र म्हणजे आपली जीभ आहे. त्यामुळे बोलताना सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे असा सल्लाही टोपे यांनी दिला.
काय म्हणाले रोहित पवार?
‘आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे’, असं रोहित पवार म्हणाले.
advertisement
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
‘राम आपला आहे, राम बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम, तो आमच्या बहुजनांचा आहे. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहात. आम्ही रामाचा आदर्श पाळतोय आणि मटण खात आहे. हा रामाचा आदर्श आहे, राम शाकाहारी नव्हताच, तो मांसहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस शाकाहारी शोधायला कुठे जाणार?’, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.