कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की, बंधाऱ्यावर साचलेला कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या सुमारे 50 टनांहून अधिक कचरा निघण्याची शक्यता आहे. यामध्ये प्लास्टिकचा कचरा आणि मृत मासे यांचा समावेश आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन ते तीन तास लागू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांनी कचऱ्याच्या समस्येवर चिंता व्यक्त करत महानगरपालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
advertisement
Health Tips: अपचन होईल दूर, थकवा नाही जाणवणार, पावसाळ्यात हे फळ खाण्याचे गुणकारी फायदे
पर्यावरणप्रेमींनी नागरिकांना कचरा वर्गीकरण करून तो योग्य ठिकाणी टाकण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी प्लास्टिक आणि इतर कचरा उघड्यावर फेकणे थांबवले पाहिजे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते आणि पाण्याचा दर्जा खालावतो, असे पर्यावरण कार्यकर्ते संजय कांबळे यांनी सांगितले. कचऱ्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास नदी आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम तीव्र करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.