TRENDING:

Maharashtra Elections Sharad Pawar : मनोज जरागेंच्या निर्णयाच्या साडेतीन तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Last Updated:

Sharad Pawar On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्णय बदलत उमेदवार मागे घेतले. जरांगे पाटील यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात आंदोलनाचे रान उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. रविवारी, जरांगे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे मतदारसंघ जाहीर केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला निर्णय बदलत उमेदवार मागे घेतले. जरांगे पाटील यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
मनोज जरागेंच्या निर्णयाच्या साडेतीन तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनोज जरागेंच्या निर्णयाच्या साडेतीन तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
advertisement

जरांगेंच्या निर्णयावर पवार काय म्हणाले?

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवर बैठक झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शरद पवार यांना मनोज जरांगेंच्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांनी सांगितले की, मनोज जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाशी आमचा संबंध नाही. मात्र, त्यांनी उमेदवार उभे केले असते तर भाजपला फायदा झाला असता असेही त्यांनी सांगितले.

advertisement

बंडखोरांवर कारवाई होणार...

शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मागील काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज घेण्याबाबत आमच्यात चर्चा सुरू होती. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवत आहोत. अपक्ष, बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ते अर्ज मागे घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

advertisement

जागा वाटपानंतर इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील पक्षांसमोर आहे. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसू शकतो.

इतर महत्त्वाची बातमी : 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

Maharashtra Elections Sharad Pawar : शरद पवार अॅक्शन मोडवर, बंडखोरांना फोनाफोनी, भूम परंडाचाही वाद मिटवला!

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Sharad Pawar : मनोज जरागेंच्या निर्णयाच्या साडेतीन तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल