TRENDING:

Maharashtra Elections Ajit Pawar : राजकारणातला अभिमन्यू झालाय का? अजित पवारांनी मौन सोडले, ''माझ्यासोबत...''

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना अजित पवारांविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार हे राजकारणातील चक्रव्यूहात अडकले असल्याचे बोलले जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बारामती :  शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर अजित पवारांनी आपली वेगळी वाट निवडत राष्ट्रवादीत बंड केले. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर आता अजित पवारांसमोर आता विधानसभा निवडणुकीचे आव्हान आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना अजित पवारांविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार हे राजकारणातील चक्रव्यूहात अडकले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आपण राजकारणातील अभिमन्यू झालो नसल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. 'न्यूज 18 लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी अनेक प्रश्नांवर रोखठोक उत्तरे दिली.

राजकारणातला अभिमन्यू झालाय? अजित पवारांनी मौन सोडले...
राजकारणातला अभिमन्यू झालाय? अजित पवारांनी मौन सोडले...
advertisement

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीरनामा देण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी अजित पवारांनी म्हटले की, यावेळी आमच्या कुटुंबातून दोघेजण उभं राहिलो आहेत. काका पुतण्याची परंपरा कायम असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत मतदार राजाचा कौल मान्य करावा लागतो. मी माझ्या परीने माझी बाजू मांडत आहे तर, ते त्यांची बाजू मांडत आहेत. मतदार सूज्ञ असून ते योग्य कौल देतात. माझा अभिमन्यू झाला असं अजिबात वाटत नसून सगेसोयरे पण माझ्या बाजूने आहेत, असेही अजित पवारांनी म्हटले.

advertisement

लाडकी बहीण गेमचेंजर ठरेल का?

अजित पवारांनी म्हटले की, लाडकी बहीण योजना चांगली आहे. या योजनेला विरोध केला पण महिलांना ही बाब आवडत नसल्याचे लक्षात आल्यावर विरोधकांकडून विरोध बंद झाला. सध्या विरोधकांकडून योजना हाणून पाडण्यासाठी केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागात ही योजना गोरगरिबापर्यंत पोहोचली असल्याचा दावा अजित पवारांनी केला.

advertisement

शरद पवारांच्या निवृत्तीची किंमत चुकवली...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

मी त्याबद्दल खूप मोठी किंमत चुकवली आहे. मला व्हिलन म्हणून महाराष्ट्रातील जनतेनं ठरवलं आहे. अशा प्रकारचा प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेला होता. ते सगळं जाहीर केल्यानंतर दोन ते तीन दिवसातचं त्यांनी तो निर्णय फिरवला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, उद्याला त्यांच्या मनात नक्की काय आहे महाराष्ट्रातील आजपर्यंत कोणालाच कळलेलं नाही, अगदी मी घरातला असलो तरी घरात  sल्या व्यक्तीलाही कळलेलं नाही, असेही अजित पवारांनी म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Ajit Pawar : राजकारणातला अभिमन्यू झालाय का? अजित पवारांनी मौन सोडले, ''माझ्यासोबत...''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल