TRENDING:

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी BJP आमदाराचा पुढाकार, विधानसभा अध्यक्षांना लिहलं पत्र, विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी

Last Updated:

राज्यातील अनेक आमदार खासदार यांनी जरांगे यांच्या आंदोलनाचा पाठिंबा दर्शवण्यास सूरूवात केली.त्यात आता भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
BJP MLA Samadhan Autade letter to the Assembly Speaker : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला आजपासून सूरूवात झाली आहे. आझाद मैदानावरील आंदोलनाची आजची मुदत संपल्यानंतर त्यांना उद्या शनिवारी पुन्हा आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे उद्या देखील जरांगे आंदोलन करताना दिसणार आहे. या दरम्यान राज्यातील अनेक आमदार खासदार यांनी जरांगे यांच्या आंदोलनाचा पाठिंबा दर्शवण्यास सूरूवात केली.त्यात आता भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
bjp mla samadhan autade
bjp mla samadhan autade
advertisement

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते मंडळी पुढे येत असून आमदार-खासदारही सहभागी होऊन भूमिका मांडत आहेत. त्यातच पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. सकल मराठा समाजास आरक्षण मिळणेकरीता महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी आमदार आवताडे यांनी केली आहे.राज्याचे विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून आरक्षणाच्या प्रश्नावर थेट भूमिका त्यांनी घेतली. राज्यात महायुतीचे सरकार असून आवताडे हे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचे ते आमदार आहेत.

advertisement

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि कुणावरही अन्याय न करता. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे,याकरिता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून एकदिवसीय अधिवेशन घेण्याची मी मागणी करतो,असे समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.मनोज जरांगे यांच्या मागण्या या सभागृहात मांडून त्या बहुमताने मान्य व्हाव्या अशी मागणी मी यानिमित्त करतो,असे समाधान आवताडे म्हणाले.

advertisement

मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप

सरकारने मराठ्यांच्या शौचालयाची व्यवस्था केली, पण तीही कुलूप बंद होती. तसेच चहा आणि वडापावची जी दुकानं होती तेही बंद केली. त्यामुळे आमच्या पोरांना चहा पाणी मिळाला नाही, जेवायला मिळालं नाही. म्हणून आमची पोरं सीएसएमटी स्थानकात गेल्याचे मनोज जरांगे सांगतात. त्यामुळे तुम्ही इंग्रजापेक्षाही बेकार झालात अशी टीका जरांगे यांनी सरकारवर केली.

advertisement

तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, गाड्या आम्ही रस्त्यावर लावणार नाही. सरकारने पण सहकार्य केलं आता आपणही सहकार्य केलं पाहिजे. दोन तासांमध्ये पोरांनी सगळ्या गाड्या ठरलेल्या ठिकाणी लावल्या आहेत,असे जरांगे यांनी सांगितलं.

तसेच आता फायनल फाईट होणार आहे, आरक्षण देणार नाहीतर मी जाणार... एक तर सरकार मला मारून टाकतील. नाहीतर उपोषण करून मी मरून जाईल. पण आता फायनल फाईट होणार आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी ठरवायचं आहे, आठमुठे पणा ठरवून निर्णय घ्यावा. मोदी आणि शहा यांनी डाग लावायचं की नाही ते ठरवायचं आहे. कारण, मराठा समाज हा महाराष्ट्राच चाक सुद्धा फिरू देणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी BJP आमदाराचा पुढाकार, विधानसभा अध्यक्षांना लिहलं पत्र, विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल