इंजिनमध्ये गडबड झाल्याने घेतला निर्णय
शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी या विमानाने नागपूर विमानतळावरून टेकऑफ केलं. विमान टेक ऑफ झाल्यावर लगेचच वैमानिकाच्या लक्षात आले की, विमानाच्या इंजिनमध्ये व्हायब्रेशन जाणवत आहेत. इंजिनमध्ये पक्षी धडकण्याची शक्यता व्यक्त करत , वैमानिकाने तातडीने विमान परत नागपूर विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विमानातील सुमारे १६० प्रवाशांचा जीव वाचला.
advertisement
ट्रॅफिक कंट्रोलला दिली अपडेट
याची माहिती तातडीनं वैमानिकाने विमानतळावर दिली. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला. हे विमान हिंगण्याच्या दिशेने निघालं होतं. तिथून पुन्हा नागपूर विमानतळाच्या दिशेनं वळवण्यात आलं. विमान सुरक्षितरित्या उतरल्यानंतर सर्व १६० प्रवाशांना विमानतळावर उतरवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची संपूर्ण रक्कम परत देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. विमानाला पक्षी धडकण्याची घटना काही नवीन नाही. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.
फ्यूल टँक लिक इंडिगोच्या विमानाचंही इमर्जन्सी लॅण्डिंग
कोलकाताहून श्रीनगरकडे निघालेल्या इंडिगोच्या 6E-6961 या विमानातील प्रवाशांना बुधवारी एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. 36000 फूट उंचावर विमानाचं उड्डाण सुरू असताना अचानक विमानाच्या इंधन टाकीतून गळती सुरू झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तातडीने मेडे मेडे मेडे असा कॉल देत अवघ्या 4 मिनिटांत विमानाचं वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. इंडिगोच्या 6E-6961 विमानात इंधन गळतीमुळे वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग, पायलटच्या समयसूचकतेमुळे 166 प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप, चौकशी सुरू आहे.
