डोणगाव येथे राहणाऱ्या निर्मला बनसोडे यांचा संसार पावसामुळे उघड्यावर पडला आहे. त्यांनी दोन बचत गटांकडून प्रत्येकी 35 हजार आणि 50 हजार रुपयांचं कर्ज घेऊन पत्र्याचं शेड उभं केलं होतं. या शेडमध्ये त्या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला. या पुराचं पाणी गावात शिरलं. निर्मला यांच्या घराच्या पाठीमागे असलेली विहिर देखील पाण्याखाली गेली परिणामी हे पाणी घरात शिरलं.
advertisement
रेड अलर्ट...! सोलापुरात महापुराचा धोका वाढला, 48 तास धो धो कोसळणार, तापमानात मोठे उलटफेर
जीव वाचवण्यासाठी निर्मला बनसोडेंच्या कुटुंबातील 11 जणांनी रात्री 2 वाजता घर सोडलं. संसार उपयोगी साहित्य, मुलांचे कपडे, नातवंडाचे कपडे, दोन गाड्या तिथेच सोडावं लागलं. लहान लेकरं आणि 5 शेळ्यांना घेऊन त्यांनी सुरक्षित ठिकाण गाठलं. सकाळी जाऊन पाहिलं असता सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये निर्मला यांचं पत्र्याचं शेड पाण्याखाली गेलं होतं. मुलांच्या दुचाकी देखील दिवस नव्हत्या. या गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत की वाहून गेल्या, याची देखील कल्पना नसल्याचं निर्मला यांनी सांगितलं.
बचत गटांचं कर्ज काढून राहण्यासाठी निवारा केला होता. पुराच्या पाण्याने तोही गिळून टाकला. पै-पै जमा करून उभा केलेला संसार तर सगळाच उद्ध्वस्त झाला आहे. अशा स्थितीत आता कर्ज कसं फेडायचं, असा प्रश्न निर्मला यांच्यासमोर उभा राहिला आहे.