TRENDING:

गावातील वाया जाणाऱ्या पाण्याचा असाही उपयोग, माऊली यांचा 'हराळवाडी पॅटर्न' चर्चेत, नेमकं काय केलं?

Last Updated:

सार्वजनिक नळांमधून वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा हराळवाडी पॅटर्न उभा केला आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : पाणी हेच जीवन या उक्तीचा प्रत्यय देणारा आदर्श उपक्रम सोलापुरातील हराळवाडी गावात राबविण्यात आला आहे. गावातील जागरूक ग्रामस्थ माऊली हेगडे यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळांमधून वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा हराळवाडी पॅटर्न उभा केला आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.
advertisement

ग्रामपंचायतीच्या आवारात आणि मोकळ्या जागेत साचणारे पाणी पाहून त्यांनी पुढाकार घेतला. या पाण्याचा अपव्यय थांबवून त्यावर तब्बल 35 ते 40 फळझाडांची लागवड करण्यात आली. केळी, सफरचंद, आंबा, चिकू आणि पपई यांसारखी विविध फळझाडे त्यांनी लावली असून कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने ती जोपासली आहेत. आज ही झाडे फुलून आली असून गावकऱ्यांना ताजी, सेंद्रिय फळे उपलब्ध होत आहेत.

advertisement

गरोदर महिलांना असाही मदतीचा हात, उचलला जातो संपूर्ण वैद्यकीय खर्च, पुण्यातील स्मितांचा कौतुकास्पद उपक्रम

53 फळझाडांची लागवड

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 वर्षांची परंपरा, सर्वात स्वस्त बांगड्यांची लेन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

यापूर्वीही त्यांनी जिल्हा परिषद शाळेत सुमारे 53 फळझाडांची लागवड केली होती. आज ती झाडे मोठी झाली असून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक मधल्या सुट्टीत त्यांची फळे खातात. वाया जाणारे पाणी थांबल्याने परिसरात डासांची उत्पत्ती कमी झाली असून रोगराईवरही आळा बसला आहे. पर्यावरण रक्षणासोबतच आरोग्य आणि सामाजिक जाणीव वाढवणारा हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. हराळवाडी पॅटर्न इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
गावातील वाया जाणाऱ्या पाण्याचा असाही उपयोग, माऊली यांचा 'हराळवाडी पॅटर्न' चर्चेत, नेमकं काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल