रोहित आचरेकर असं या डोंबिवलीकर तरुणाचं नाव असून त्याच्या उपक्रमाचं यंदा 17 वं वर्ष आहे. रोहित या वर्षी 28 हजार राख्या आणि 750 किलो मिठाई जवानांना देणार आहे. त्यासाठी तो डोंबिवली सुरत अहमदाबाद, जयपुर, उदयपूर , पाली, दिल्ली, चंदीगड मार्गे कारगिलला जाणार आहे. यासाठी जवळपास 2500 किलोमीटर प्रवास करणार असल्याची माहिती त्यानं दिली.
advertisement
बांबूची राखी पाहिलीत का? परदेशातही आहे मोठी मागणी
कशी झाली सुरुवात?
देशाच्या रक्षणासाठी सैनिकांना घरापासून लांब सीमेवर रहावं लागतं. हे जवान देखील बहिणीच्या राखीची आतुरतेनं वाट पाहात असतात. त्यांच्या या भावना लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू केला असल्याचं रोहितनं सांगितलं. 'मी शाळेत असताना सैनिकांना पोस्टकार्ड पाठवत असे. ते पोस्टकार्ड त्यांच्यापर्यंत पोहचतात का? असा प्रश्न तेव्हा सतावायचा. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष राखी नेऊन देण्याचं ठरवलं. रोहितबरोबर यंदा वास्तूविशारद प्रेम देसाई आणि फायर फायटर ससून गावडे हे देखील या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
28 राज्यातून राख्या
रोहितला या उपक्रमासाठी रोटीर क्लबकडून जवळपास 28 राज्यातून राख्या आणि मिठाई आल्या आहेत. प्रत्येक राज्यात आमची टीम आहे. गेल्या 20 दिवसांपासून त्यांचं या विषयावर काम सुरू होतं, अशी माहितीही रोहितनं दिली.