समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. ही आग इतक्या वेगाने पसरली की काही क्षणांतच बसने पेट घेतला.चालक आणि वाहकांनी प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही मिनिटांतच बस जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
advertisement
सर्व प्रवासी सुखरूप
या घटनेमुळे प्रवाशांनी दिलासा व्यक्त केला असला तरी एसटी बसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील पालकमंत्री तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर ही गंभीर समस्या उभी ठाकली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, एसटी ताफ्यातील जुनी व धोकादायक बसांची दुरवस्था, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले असले तरी या घटनेने एसटी प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.