खरं तर महाराष्ट्राती सत्तासंघर्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रावादी आमदाराच्या अपात्रते प्रकरणी ठाकरे आणि शरद पवार सुप्रिम कोर्टात गेले होते. आणि हे प्रकरण सरन्याय़ाधीश यांच्या बेंचसमोर होते. त्यामुळे सरन्यायाधीश त्यांच्या निवृत्तीपुर्वी या प्रकरणाचा निकाल देतील, अशी अपेक्षा होती. मात्र यावर अद्याप निकाल लागू शकला नाही, त्यामुळे ठाकरेंनी कडक शब्दात यावर प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
ठाकरे म्हणाले की, आपले सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे आहेत, ते आता निवृत्त झाले आहे. त्यांच्या अपयशाचं संचित घेऊन ते निवृत्ती झाले आहे.पण ते लोकशाहीला न्याय देऊ शकले नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
मी आताच मध्यंतरी ऐकलेलं की 8 तारखेला सुनावणी आहे. पण मी आधीच बोलेलो ही सुनावणी आहे की बतावणी आहे,हे कळेल आणि ती बतावणी निघाली आहे. आता मला वाटतंय चंद्रचुड यांना घेऊन यमाई देवीच्या मैदानातच जाणार आहे. काय तो न्याय द्या आम्हाला..असा टोला देखील ठाकरेंनी सरन्याधीशांना लगावला आहे.
ठाकरे पुढे म्हणाले की, आता पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाही, जास्त कपटी खूनशी आणि खालच्या पातळीवर गेलं आहे. स्वत: चं कर्तृत्व नाही, किंमत नाही पक्ष फोडायचा पळवायचा आणि मग माझाच पक्ष सांगायचा, असा टोला देखील ठाकरेंनी शिंदेंना लगावला आहे.तसेच आता न्याय आता कधी मिळल हा पण प्रश्न आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
