TRENDING:

Indian Currency History : भारतात कागदी चलन कधी आलं? दहा हजारांच्या नोटेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Last Updated:

Indian Currency History : भारतातील कागदी पैशाचा इतिहास सुमारे 150 वर्षांचा आहे. 18 व्या शतकात, बँक ऑफ हिंदोस्तान जनरल बँक आणि बंगालमधील बंगाल बँकेने भारतात कागदी चलन जारी केले होते.

advertisement
मुंबई, प्रतिनिधी : सध्या अगदी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि ऑनलाइन ट्रान्झॅक्शनच्या जमान्यातही आपल्या खिशात काही पैसे कॅश स्वरूपात ठेवणं आपण महत्त्वाचं मानतो. नवीन नोट जपून ठेवणारे किंवा संग्रह करणारेही अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात. या नोटा भारतात नक्की केव्हा वापरात आल्या? काळाबरोबर छापील चलनी नोटांमध्ये नक्की कसा बदल होत गेला असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर त्याची उत्तरं पाहू या.
News18
News18
advertisement

बालपणापासून आजपर्यंत नोटांचे विविध आकार, रंग आणि मूल्य तुम्ही बदलताना पाहिलं असेल. एक काळ होता जेव्हा अगदी 1, 2 आणि 5 रुपयांचीही नोट होती. आता त्यांची नाणीच असतात. 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटेनेही आपलं रंगरूप बदललंय. तुम्हाला माहितीये का, की भारतात हे कागदी किंवा छापील चलन अगदी अलीकडेच म्हणजे गेल्या 150 वर्षातच दाखल झालंय. त्यापूर्वी फक्त नाण्यांच्या स्वरूपातच भारतीय चलन अस्तित्वात होतं.

advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 18व्या शतकाच्या शेवटी भारतात कागदी चलन म्हणजेच नोटा वापरण्यास सुरुवात झाली. त्या वेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. पहिली भारतीय नोट भारत सरकारने काढली होती. त्यानंतर 1938 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे काम आपल्या हाती घेतलं. 18व्या शतकात बंगालमध्ये बँक ऑफ हिंदुस्तान जनरल बॅंक आणि बंगाल बॅंकेने भारतात कागदी चलन आणलं. 1861 मध्ये पेपर करन्सी ॲक्ट आला आणि कागदी चलन ही जबाबदारी मिंट मास्टर, महालेखाकार आणि करन्सी मॅनेजर यांच्यावर सोपवण्यात आली. भारत सरकारने 1861मध्ये पहिली दहा रुपयांची नोट आणली. त्यानंतर 1872मध्ये 5 रुपयांची नोट आली. 1899मध्ये 10,000 रुपयांची नोटही येऊन गेली. 1900मध्ये 100 रुपयांची नोट आली. 1905मध्ये 50 रुपयांची नोट आली. 1907मध्ये 500 रुपयांची नोट आली. 1909मध्ये 1000 रुपयांची नोट आली. 1917मध्ये 1 रुपयाची आणि 2.5 रुपयांची नोटही आली. अर्थात काळाबरोबर त्यातल्या किती तरी नोटा पुढे बंदही झाल्या.

advertisement

वाचा - एक जानेवारीपासून वर्षच नाही तर 'हे' नियम देखील बदलणार; चेक करा नव्या नियमांची यादी एका क्लिकवर

भारतीय रिझर्व्ह बँकेने 1938मध्ये भारतीय चलनी नोटा बाजारात आणल्या. पाच रुपयांच्या नोटेवर सहाव्या जॉर्जचा फोटो होता. 1899मध्ये काढण्यात आलेली दहा हजार रुपयांची नोट 1946मध्ये मागे घेण्यात आली. 1949मध्ये 5000 रुपयांची नोट आली. ती 1978मध्ये बंद करण्यात आली.

advertisement

1996मध्ये 10 आणि 500 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आला. त्यानंतर लायन कॅपिटल सीरिजमधल्या नोटा बदलण्यात आल्या. सध्या वापरात असलेल्या चलनी नोटांना महात्मा गांधी सीरिजच्या नोटा असं म्हटलं जातं. 1996पूर्वी सगळ्या नोटांवर गांधीजींचा चेहरा नव्हता. अशोक स्तंभ, तंजावरचं मंदिर, इंडिया गेट, बंगाल टायगर अशा विविध गोष्टींची चित्रं तेव्हा नोटांवर होती.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Indian Currency History : भारतात कागदी चलन कधी आलं? दहा हजारांच्या नोटेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल