प्रदूषण मुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी जागतिक स्तरावर 4 डिसेंबर रोजी स्वारस्य अभिरुची मागवण्यात आली होती. आतापर्यंत स्वारस्य अभिरुचीस सहा भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. आता पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहे.
दरम्यान, कृत्रिम पावसासाठी मागवण्यात आलेल्या निविदेसाठी मुदतवाढ न देता पुढील निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल, असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
advertisement
तंत्रज्ञान समजून घेणार!
हवेत धुळीचे कण, प्रदूषण थांबून राहत असल्यामुळे कृत्रीम पावसाचा प्रयोगही केला जाणार आहे. यासाठी कंपन्यांकडून त्यांचे तंत्रज्ञान समजावून घेतले जाणार आहे. यानंतर पात्र ठरणारे तंत्रज्ञान निश्चित झाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत. यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहेत. यामध्ये ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ 100 पर्यंत असल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची गजर पडणार नाही. ‘एक्यूआय’ वाढल्यास कृत्रीम पाऊस पाडला जाईल.