राज्य सरकारने काही वर्षांपूर्वीच मुंबईकरांसाठी रोपवे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नॅशनल पार्कमधील निसर्गाची मजा लूटत मुलुंड येथून थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ऐतिहासिक तीन मूर्ती मंदिरापर्यंत जाण्याची योजना होती. परंतु, हा प्रकल्प गेल्या काही काळात कागदावरच राहिला होता. हा प्रकल्प लकवरात लवकर साकारण्यासाठी मुलुंडमधील लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासोबत पत्रव्यवहार करून या प्रकल्पाचा अहवाल पर्यटन विभागाला पाठवण्याची मागणी केली होती. त्यानुसार लवकरच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल पर्यटन विभागाला सादर करण्यात येणार आहे.
advertisement
मुंबईकरांसाठी खूशखबर! लवकरच धावणार देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी, असा असेल मार्ग
तीन मूर्ती मंदिरात थेट जाण्याची सोय
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील नयनरम्य टेकडीच्या माथ्यावर तीन मूर्ती मंदिर आहे. सध्या या मंदिरात जाण्यासाठी भाविक आणि पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. मंदिरापर्यंत पायी जाताना ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे मंदिरात भाविकांना सहज प्रवेश मिळावा व नॅशनल पार्कचे सौंदर्य देखील पर्यटकांना पाहता यावे हा या रोपवेचा उद्देश असून याची मागणी गेल्या 5-6 वर्षांपासून येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधी करत आहेत.
मुंबईकरांसाठी नवं पर्यटनस्थळ
दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित हरित क्षेत्राला कोणतीही बाधा न आणता मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. यात ‘व्ह्यूइंग गॅलर’ सारख्या सुविधा देखील उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढणार असून मुंबईकरांसाठी एक नवं पर्यटनस्थळ उपलब्ध होणार आहे.