नेमकं काय घडलं?
पनवेलमधील बी. पी. मरीन अकॅडमीमध्ये अनेक मुलं शिक्षण घेण्यासाठी आहेत. याठिकाणी त्यांनी जेवणही दिलं जातं. अनेक दिवसांपासून जेवण आणि पाणी यासंदर्भात मुलांची तक्रार होती. मात्र, अकॅडमी प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा मुलांचा आरोप आहे. बाहेर कुणालाही सांगण्यास मुलांना मनाई करण्यात आली आहे. ही घटना 12 मार्च रोजी घडली. मात्र, अजूनही मुलांवर उपचार सुरूच आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचंही उघड होत आहे. यापूर्वीही राज्यात काही ठिकाणी अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे प्रशासन याविरोधात काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 14, 2024 4:21 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : नवी मुंबईत दीडशे मुलांना विषबाधा, विद्यार्थ्यांनी सांगितला अकॅडमीतला धक्कादायक प्रकार