पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी काही लोकांनी निर्देशांचे उल्लंघन केले आणि रस्त्यावर प्रार्थना केली. या प्रकरणी 80हून जास्त लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या वेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक सिंह म्हणाले. या संदर्भात यापूर्वीच नोटीस जारी करण्यात आल्याचा उल्लेख करत सिंह यांनी इशारा दिला की रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांचे पासपोर्ट आणि लायसन्स रद्द केले जाऊ शकतात.
advertisement
ते म्हणाले, "जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असतील तर त्याचे पासपोर्ट आणि लायसन्स रद्द केले जाऊ शकतात आणि न्यायालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्याशिवाय नवीन पासपोर्ट मिळवणे कठीण होईल. असे कागदपत्रे व्यक्ती न्यायालयातून निर्दोष ठरल्याशिवाय जप्त राहतील." मेरठचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विपिन ताडा यांनी 'पीटीआय व्हिडिओ'ला सांगितले की शांततापूर्ण उत्सव सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा जिल्हा प्रशासन, धर्मगुरु आणि स्थानिक लोकांसोबत मिळून काम करत आहेत. जिल्हा आणि पोलीस स्टेशन दोन्ही स्तरांवर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत आणि सर्व पक्षांशी चर्चा करून आवश्यक निर्देश जारी करण्यात आले आहेत.
ते म्हणाले, "सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवण्याचा किंवा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि जातीय सलोखा बिघडवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कठोरपणे सामोरे जाऊ." सुरक्षेमध्ये वाढ करण्यासाठी प्रांतीय सशस्त्र दल (पीएसी) आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) च्या जवानांना तैनात करण्यात आले आहे आणि जिल्ह्यात फ्लॅग मार्च काढले जात आहेत. मागील अनुभवांच्या आधारावर संवेदनशील क्षेत्रांची ओळख पटविण्यात आली आहे आणि तेथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.