राहुल गांधी यांनी आरोप आणि प्रश्न विचारले होते की- मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पुरावे नष्ट केले जात आहेत. त्यांनी विचारले, विरोधी पक्षांना डिजिटल मतदार यादी का मिळत नाही? सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पुरावे का आणि कोणाच्या सांगण्यावरून नष्ट केले जात आहेत? बनावट मतदान आणि मतदार यादीत गडबड का केली गेली? विरोधी नेत्यांना का धमकावले जात आहे? स्पष्टपणे सांगा की निवडणूक आयोग आता भाजपचा एजंट बनला आहे का?
advertisement
जर इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर ते हे सिद्ध करून दाखवतील की पंतप्रधान मत चोरी करून या पदावर आले आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी पुन्हा म्हटले की, केवळ 25 जागांमुळे आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आहेत. काँग्रेस नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमची युती जिंकली. पण सहा महिन्यांनंतर आश्चर्यकारक निकाल आले. महाराष्ट्रात केवळ पाच महिन्यांच्या आत एक कोटी नवीन मतदारांनी मतदान केले आणि या सर्वांनी भाजपला मतदान केले.
निवडणूक आयोगाकडे डिजिटल मतदार यादी आणि मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असता, त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, त्यानंतर बेंगळूरु मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा हे सिद्ध झाले की लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपने मतांची चोरी केली आहे. त्यांनी दावा केला की, महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की, प्रत्येक सहा मतांपैकी एका मताची चोरी झाली आहे.