नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन
महापौर अंजुम आरा यांनी नमाजाच्या वेळी मस्जिद आणि नमाज पठणाच्या ठिकाणांपासून दूर राहण्याची विनंती केली आहे. त्यांनी यापूर्वी देखील रमजान आणि होळी एकाच वेळी शांततेत पार पडल्याचे सांगितले. तसेच, जिल्हा प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंस्टाग्राम फ्रेंडकडून क्रूर अत्याचार! ब्लॅकमेल करून 16 महिने केला बलात्कार
advertisement
BJP कडून तीव्र विरोध
महापौरांच्या यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते कुन्तल कृष्णा यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी विचारले की, सतत हिंदूंनाच गंगा-जमूनी तहजीब पाळण्यास का सांगितले जाते? जर हिंदूंनी सहकार्य करायचे असेल, तर मुस्लिमांनीही विचार करावा की होळी वर्षातून फक्त एकदाच येते.
दरभंगामध्ये होळीवरून वाद पेटण्याची शक्यता
मेयर अंजुम आरा यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, भाजपने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आता प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.