TRENDING:

Operation Sindoor : आग ओकणारा क्षण कॅमेऱ्यात कैद, 19 दिवसांनी समोर आला वॉर रूमचा थरारक फोटो

Last Updated:

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने जबरदस्त हल्ला चढवला.या निर्णायक क्षणी वॉर रूममध्ये तिन्ही लष्करप्रमुख एकत्र उपस्थित असल्याचा फोटो आता समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: पाकिस्तानवर बॉम्ब वर्षाव होत असताना वॉर रूममध्ये बसून तिन्ही सेनाप्रमुख 'ऑपरेशन सिंदूर'ला दिशा देत होते. 'ऑपरेशन सिंदूर'ला 19 दिवस उलटले असले तरी या कारवाईचे नवे फोटो अजूनही समोर येत आहेत. या ऑपरेशनच्या अनेक फोटोंनी आतापर्यंत देशात उत्साह निर्माण केला आहे. पण सोमवारी पाकिस्तानवरील हल्ल्याचे सर्वात शक्तिशाली चित्र समोर आले. हे चित्र सर्वात शक्तिशाली यासाठी कारण यात तिन्ही सेनाप्रमुख 'ऑपरेशन सिंदूर'चे थेट प्रक्षेपण पाहताना दिसत आहेत.
News18
News18
advertisement

वॉर रूममधील तीन सेनाप्रमुख

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर भारताचे बॉम्ब बरसले असताना वॉर रूममध्ये भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह आणि भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल दिनेश उपस्थित होते. हे तिघेही महत्त्वाच्या क्षणी एकत्र निर्णय घेताना आणि कारवाईचे निरीक्षण करताना दिसले.

advertisement

ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी

22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप लोकांवर भीषण हल्ला केला होता. ज्यात 26 नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांना मारण्यात आले. मृतांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक होते. या हृदयद्रावक घटनेनंतर भारतीय लष्कराने 7 मे रोजी दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले.

advertisement

बॉर्डरवर राफेल, S-400 तैनात; डोळे वटारले तर जिवंत परतणार नाही, सीमेवर तणाव वाढला

भारताची निर्णायक प्रत्युत्तर कारवाई

लष्कराच्या या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. यात मसूद अजहरच्या लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हाफिज सईदच्या जमात-उद-दावाच्या दहशतवादी शिबिरांचा समावेश होता.

दरम्यान पाकिस्तानी लष्कराने प्रत्युत्तर म्हणून भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणाली जसे की आकाशतीर आणि एस-४०० ने, त्यांना हवेतच नष्ट केले. यानंतर भारताने कठोर पलटवार करत पाकिस्तानच्या 9 ते 11 हवाई दलाचे तळ उद्ध्वस्त केले. या कठोर लष्करी कारवाईमुळे भयभीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने युद्धविरामाची मागणी केली.

advertisement

पाकिस्तानी DGMO ने भारतीय समकक्षेशी संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला. ज्यावर दोन्ही देशांनी तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती दर्शविली. भारताने आपल्या लष्करी कारवाईचे पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सादर केले. ज्यामुळे हे स्पष्ट झाले की भारताची प्रत्युत्तर कारवाई केवळ आत्मसंरक्षण नसून दहशतवादी ठिकाणांना मुळापासून नष्ट करण्याच्या निर्णायक धोरणाचा भाग होता.

मराठी बातम्या/देश/
Operation Sindoor : आग ओकणारा क्षण कॅमेऱ्यात कैद, 19 दिवसांनी समोर आला वॉर रूमचा थरारक फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल