कोकणातील 'या' मार्गांवरील बसेस रद्द
सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबई महापालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 4 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबईतील रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेलेले आहेत. या पार्श्वभूमीवल सांगलीच्या एसटी विभागाकडून कोकणात जाणाऱ्या बससेवांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत.
advertisement
पावसाचे अपडेट घेऊन पुढे निर्णय घेणार
सांगली एसटी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मिरज-मुंबई आणि सांगली-मुंबई ही एसटी बस वाशीपर्यंत गेली. त्याचबरोबर बुधवारी (20 ऑगस्ट) मुंबईकडे जाणाऱ्या बसेस वाशीपर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिपळूण आणि राजापूर तालुक्यातही अतिवृष्टी झाल्यामुळे मिरज-दापोली आणि कवठे महांकाळ-दापोली या बस रद्द करण्यात आल्या आहेत. सांगली विभागाकडून सांगण्यात आलं आहे की, मुंबईसह कोकणातील पावसाची अपडेट घेतली जात आहे. त्यानुसार पुढे निर्णय घेतले जातील.
हे ही वाचा : मोठी बातमी! रत्नागिरीत ऑरेंज अलर्टने भीती, पावसाचा कहर; उद्या शाळा बंद, प्रशासन हाय अलर्टवर
हे ही वाचा : Mumbai Rain: बुधवारी हायअलर्ट! मुंबई-ठाण्यावर पुन्हा धो धो कोसळणार, 24 तास धोक्याचे!
