शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं! वादळी वाऱ्यासह गारपीट, या तारखेपर्यंत अवकाळी पाऊस झोडपणार, कोणत्या भागांना अलर्ट?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
1/5

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
2/5
या बदलत्या हवामानाचा प्रभाव विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
१८ ते २० मार्चदरम्यान हवामान अधिक अस्थिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनीही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
4/5
सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा किंवा त्यावर योग्य प्रकारे आच्छादन करावे. तसेच हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत. असंही सांगण्यात आले आहे.
advertisement
5/5
संभाव्य पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं! वादळी वाऱ्यासह गारपीट, या तारखेपर्यंत अवकाळी पाऊस झोडपणार, कोणत्या भागांना अलर्ट?